शक्ती आणि भक्ती चे प्रतिक : आजोबा गणपती

सोलापूरचा इतिहास पहायचा ठरवले तर आजोबा गणपतीशिवाय पूर्ण होणार नाही. महाराष्ट्रच नाही तर सार्या जगात, आज सार्वजनिक गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात करणार्या लो . आजोबा गणपती कमान्य टिळकांना ही कल्पना सुचली ती त्यांच्या सोलापुरातील प्रवासात. घटना अशी आहे की, भारत स्वातंत्र्याची लढाई संपुर्ण देशात जोरात सुरु असताना स्वातंत्र्य चळवळीसाठी लोकमान्य टिळक 1885 साली सोलापुरात आले होते. सोलापुरातील त्यांचे मित्र अप्पासाहेब वारद यांच्या ‘इंद्रभवन’मध्ये (साध्य महानगरपालिकेची इमारत) ते नेहमी उतरत असत. अप्पासाहेबांसोबत शुक्रवार पेठेतील पानसुपारीच्या आणि गणेश उत्सवास येणार्या लोकांची संख्या पाहून टिळकांना हे उत्सव सर्वत्र साजरे करण्याची आवश्यकता प्रकर्षाने जाणवली आणी 1893 साली त्यांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची संकल्पना महाराष्ट्रात यशस्वीपणे राबवली स्वातंत्रसैनिकांची खाण भारताच्या स्वातंत्रलढयाच्या इतिहासात सोलापूरला विशेषस्थान आहे....